
"गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे सज्ज", "गणराय निघाले" अशा आशयाच्या बातम्या पेपर मध्ये वाचत एकटाच बसलो होतो. रात्रीची वेळ होती. गेले दहा दिवस सर्व आसमंत बाप्पामय झाला होता.खर पाहायला गेल तर बाप्पांच येण आणि जाण ह्या दोन्ही संकल्पना मला फार मजेशीर वाटतात. कारण ह्या सगळ्याचा मालक आहे तो. तो गेला तर हाहाकार उड़ेल. :) पेपर वाचता वाचता फार वाटत होत की विसर्जन मिरवणुक पाहायला जाव पण मूड नव्हता. मिरवणुकीत पुण्याच ग्रामदैवत कसबा गणपती, मानाचे इतर गणपती, "श्रीमंत" शब्दाला खरया अर्थाने न्याय देणारा दगडूशेठ ह्याना पाहताना मिळनार समाधान काही औरच. म्हणून पेपर बाजुला ठेवला आणि निघालो एकटाच बाप्पांच दर्शन घ्यायला.
ढोल ताशे, लेझीम, टाळ मृदुंग ह्या पारंपारीक वाद्यानी वातावरण भक्तिमय झाल होत. डोल्बी आणि त्याच्या तालावर नको तसे नाचणारे भक्त (?) ही विकृतीसुद्धा त्या वातावरणात मिसळली होती. हे सर्व पाहात मी पुढे चालत होतो. इतक्यात समोरून बाप्पांची एका रथावर विराजमान झालेली मूर्ती दिसली. आहाहा... काय तो थाट.. ते तेज फ़क्त ह्या विधात्याकडेच असू शकत हे स्पष्ट जाणवत होत. अंगावर शहारे आले. समाधानाची लाट मनाला येवून थडकली. मी दोन्ही हात जोडून डोळे मिटून बाप्पाना नमस्कार केला.. डोळे उघडले अन मी अवाक झालो... बाप्पा चक्क रथावरून खाली उतरत होते.. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना..
आजूबाजूची विकृती धिंगाना घालत होती.. कुनाचच लक्ष नव्हत की बाप्पा खाली उतरत आहेत... खाली उतरून बाप्पा माझ्याजवळ आले.. मी आ वासून बघत उभा होतो.. करणार तरी काय.. ह्या जगाचा मालक माझ्या समोर उभा होता.. "ह्या गर्दीत कुणीतरी मला भेटायला आल्याच पाहून बर वाटल" बाप्पांचे ते शब्द ऐकून मी थोड़ा भानावर आलो.. "अहो.... बाप्पा.... तुम्ही..." बोलता बोलता मी त्यांच्या पायाला स्पर्श केला.. "तुला चहा खुप आवडतो ना.. चल चहा पित गप्पा मारू"... तसाच हादरलेल्या अवस्थेत मी त्यांच्या बरोबर जवळच्या टपरीवर गेलो..
"छोट्या, दोन स्पेशल घे रे"... मी ऑर्डर दिली.. मला एकट्याला दोनची ऑर्डर देताना पाहून तो छोट्या तिरकस नजरेने बघून गेला... पण माझ्या बरोबर बाप्पा आहेत अस सांगितल तर उद्यापासून गरीबाला चहा सुद्धा महाग होइल म्हणून मी काही बोललो नाही... "कसे आहात बाप्पा? सगळ ठीक आहे ना?" मी विचित्र प्रश्नाने सुरुवात केली. "मी रथावर नाही आहे तरी सगळे आपापल्या भक्तीत(?) गुंतलेत हे पाहून मी कसा असेन अस वाटत तुला भक्ता?" बाप्पांच्या प्रतिप्रश्नाने मी विचारात पडलो. "अरे हे काय चालवलय माणसाने... कुठे कुठे शोधायचा प्रयत्न करतोय तो मला.. सर्वस्व हरवून परमेश्वर शोधतोय..." "खरय बाप्पा तुमच... अहो इथे सगळ संपल्यासारख वाटतय हो.. कुणीच कुणाचा नाही उरलेला इथे.. सगलेच हरवलेले.. तुम्ही दिलेल्या ह्या प्रखर सूर्याची, आई सारखी माया करनारया पृथ्वीची, अथांग सुंदर समुद्राची दखलही नाही होत बाप्पा इथे... खुप वाटत हो की तुम्हाला भेटून सांगाव की बस झाल बाप्पा.. तुम्ही आम्हाला फुकट दिलेल हे सगळ परत घ्या... आम्ही हे सगळ उपभोगायच्या लायकीचे नाही राहिलो..."
ऐकता ऐकता बाप्पांचा व्यथित झालेला चेहरा स्पष्ट जाणवत होता.. "खुप स्वप्न होती माझी ह्या जगाची निर्मीती करताना... ज्याच्या सौंदर्याची व्याख्या सुद्धा कुणाला जमणार नाही अस काहीतरी बनवायच ह्या इराद्याने हे जग बनवल... पण कुठे काय चुकल समजत नाही.. सूर्य आजही रोज उगवतो.. चंद्र आजही तितकाच देखना आहे... झाडे आजही वारयाबरोबर गाणी गातात.. पाऊस आजही बेभानपणे कोसळतो.. कोकीळा आजही सुरात गाणी गाते... पण मग माणूस का हरवलेला? का कित्येक डोळ्यात मला लपवलेल पाणी दिसतय? खुप अस्वस्थ होतो रे मी भक्ता जेव्हा माणूस मलाच माहीत नसलेल्या प्रश्नांची उत्तर मागायला रांगा लावून माझ्या दारात उभा असतो.. स्वताहाभोवती इतकी आवरण बनवून बसलाय माणूस की मलाच शोधाव लागतय मी बनवलेला माणूस कुठे गेलाय ते..."
बाप्पांचा प्रत्येक शब्द मला आत्मपरिक्षण करायला भाग पाडत होता... किती स्वार्थी आहोत आपण सगळे.. विधात्यालाही मन असेल ह्याचा कधी विचारही नाही करत आपण... "होय बाप्पा... आमच खुप चुकतय हे आम्हालाही पटत.. पण ह्या चक्रव्युहातुन बाहेर कस पड़ाव ते समजत नाही हो.. पैसा, संपत्ती, स्वार्थ ह्यांच्या जंगलात आम्ही हरवलोय... ह्यातून बाहेर पडायची इच्छा खुप आहे पण मार्ग सापडत नाहिये.. तुम्हीच मार्ग दाखवा बाप्पा..."
बाप्पानी एक सोनेरी पिशवी बाहेर काढली.. मला म्हणाले, " माझ्या हातून घडलेली अजरामर कलाकृती आहे हयात... मी स्वप्न ही नव्हत पहिल की अस काही मी निर्माण करू शकतो.. आजही जेव्हा मी व्यथित होतो तेव्हा ह्याकडे पाहिल की मला पुन्हा नवी उमेद मिळते.. हे घे तुला.. जेव्हा जेव्हा तुला प्रश्न पडतील तेव्हा हे तुला उत्तर शोधायला मदत करेल.. जपून ठेव.." मी आनंदाने ती पिशवी घेतली आणि त्यात हात घातला... एक लख सोनेरी वस्तु माझ्या हातात आली आणि चमत्कार.. त्यात मला माझाच चेहरा दिसला..
बाप्पा हसुन म्हनाले "माझ्या हातून घडलेली अजरामर कलाकृती.. मला जन्माला घालणारा आणि माझ्या शोधात जगभर भटकनारा एकमेव प्राणी.. 'माणूस'..... " मी वाकून बाप्पाना प्रणाम केला..
"बोल तुला काय हवे?" मी म्हणालो "बाप्पा, तुम्ही दिलेल्या ह्या आयुष्यासाठी तुमचे आभार... माझ्या आयुष्यात माझ्यावर मनापासून प्रेम करणारी माणस दिल्या बद्दल तुमचे आभार..बाकी काही नको बाप्पा, माझ्या मनात समाधानाचा कप्पा सदैव जीवंत राहू दया, हातून चुक घडली तर माफी मागायची ताकत माझ्यात सदैव राहू दया, माझ्यावर प्रेम करणारया माणसाना तितकच प्रेम करायची प्रेरणा माझ्यात असू दया.. ह्या जगावर तुमचा वरदहस्त आणि तुमच प्रेम सदैव राहू दया"... तथास्तु म्हणून बाप्पा निघाले...
"थांबा बाप्पा.. जाता जाता एक प्रश्नाच उत्तर देवून जा.. मेल्यानंतर माणस कुठ जातात बाप्पा? काही माणस डाव अर्ध्यावरच सोडून गेलेत.. ती परत भेटतील का हो बाप्पा?" बाप्पा शांत नजरेने माझ्याकडे पहायला लागले...
माझ्या प्रश्नाच ते उत्तर देणार इतक्यात कानाजवळ कर्कश्य आवाज ऐकू आला... डोळे उघडून शेजारी पाहिल तर पहाटे ६.३० चा गजर वाजत होता.. छातीवर पेपर तसाच होता.. स्वप्न होत.. बाप्पांच विसर्जन झाल होत... उठून शेजारच्या गणपती मूर्तीला नमस्कार करून आयुष्याच्या गाडीवर स्वार झालो...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !!! :)
Kay lihitos yaar!!!...Kharach Chhan lihilayes.. :)
ReplyDeleteKeep it up!!!
Awesome...........:)
ReplyDeletebhari!!
ReplyDelete