Sunday, June 26, 2011

आवाज कुणाचा


आपला भारत देश तीन गोष्टींसाठी वेडा आहे. क्रिकेट, बॉलीवूड आणि राजकारण. त्यातल्या त्यात सध्या राजकारण हा विषय बराच तापलाय. मित्रांबरोबरच्या कट्ट्या पासून ते colligues बरोबरच्या cafetaria पर्यंत राजकारण हा एकच विषय चर्चिला जातोय. माझा सुद्धा हा प्रचंड आवडीचा विषय. त्यामागची कारणे दोन. पहिल आणि महत्वाच कारण म्हणजे माझे बाबा राजकारणात आहेत. त्यामुळे लहानपनीपासून मी राजकीय वातावरण खुप जवळुन पाहिलय. 'चोरी करू नये' आणि 'नेहमी खरे बोलावे' असल्या संस्कारांबरोबरच 'मतदान केलच पाहिजे' हा संस्कार सुद्धा माझ्यावर बालपनीच झाला. :) ह्या आवडीमागच दुसर कारण म्हणजे मी मुळचा कोल्हापुर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातला आहे. आता कोल्हापुर म्हंटल की 'खाईन तर तुपाशी नाहीतर घाल काशी' ह्या विचारसरणीची मानस. जिथे संघर्षाची गरजच नाही तिथेही संघर्षाला तयार असतात. मग जिथे गरज आहे तिथे तर बघायलाच नको. त्यात राजकारण आणी संघर्षाच तर रक्ताच नात. कागल तालुका तर आमच्या जिल्ह्यातल्या राजकारणाची रणभूमी. आपल्या पुण्यात कस ओळख सांगताना नावा बरोबर कंपनीच नाव सांगतात ना तस आमच्या तालुक्यात नावा बरोबर पक्षाच म्हणजे गटाच नाव सांगतात इतक राजकारण रक्तात भिनलेल. थोडासा अतिशयोक्ती अलंकाराचा touch देवून बोलायच झाल तर नविन बाळ जन्माला आल की 'ह्याच नाव काय ठेवायच' ह्या चर्चेच्या आधी 'कोणत्या गटाच एक मत वाढल' ह्याची चर्चा आमच्या तालुक्यात आधी सुरु होते. हे सगळ जवळून पाहताना मला आलेले काही अनुभव तुमच्याशी आज शेअर करतो. काही अनुभवलेले तर काही ऐकलेले... जितके मजेशीर तितकेच मार्मिक.. :)
ग्रामपंचायतीच्या निवडनुकीचा जोश शिगेला पोहोचला होता. दोन्ही गटाचे कार्यकर्ते गाड्या फिरवत दिसेल त्या माणसाला उचलून मतदान केंद्रापर्यंत नेत होते. 'दिसला की उचला' असे आदेशच होते नेत्यांचे. दिवसभर नुसती पळवापळवी चालु होती. साडेचार वाजले. अर्ध्या तासानी मतदान बंद होणार म्हणून दोन्ही गटाकडून 'कुणाला उचलायच राहिलय का?' ह्याची चर्चा सुरु झाली. मतदान यादीमध्ये एक नाव सापडल. ज्यानी अजुन मतदान केल नव्हत त्यांच वय 70 होत आणि त्याना ठीक चालता आणि बोलता येत नव्हत. पण break up नंतर sad songs ना जेवढी किम्मत असते त्याहीपेक्षा जास्त किम्मत ग्रामपंचायतीच्या वेळी एका मताची असते. त्यामुळे दोन्ही गटाच्या गाड्या त्या माणसाच्या घराकडे वळल्या. त्याना कोण घेवून जाणार यावरून बाचाबाची झाली. शेवटी पहिला जी गाडी पोहोचली होती त्यात त्याना बसवून मतदान केंद्रा पर्यंत आणल. आता त्याना चालता येत नव्हत... त्याना आत उचलून कोण नेणार ह्यावरून मारामारी सुरु झाली.. शेवटी निवडनुक अधिकारयानी मध्यस्थी करून असा तोडगा काढला की ते आजोबा कुणाला मत दयायच आहे ते त्या अधिकारयाच्या कानात सांगतील. आजोबांचे ओठ अधिकार्याच्या कानाला आणि दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचे कान अधिकार्याच्या दुसर्या कानाला भिडले... आजोबा बोलले आणि ते कार्यकर्त्यानी ऐकल सुद्धा... ज्या गटाला मत मिळाल होत त्यांच आकाश ठेंगन झाल.. 1947 साली ब्रिटीश्यांचा झेंडा खाली उतरवून तिरंगा फड़कल्यावर लोकांना जितका आनंद झाला नसेल इतका आनंद त्याना झाला........ गुलालाच्या रंगात आसमंत रंगून गेला......... आणि कुणीतरी आरोळी ठोकली.. "आवाज कुणाचा".....
रोजच्या अड्डयावर नेता आणि त्याचे कार्यकर्ते गप्पा मारत बसले होते.. दिल्ली पासून ते गल्ली पर्यंतचे विषय चर्चीले जात होते. 'भारताचा विकास' ह्या विषयावर सुरु झालेली चर्चा 'शास्त्रीय संगीत' ह्या विषयावर येवून पोहोचली.. आता ते कस ते विचारू नका... लहानपणीच्या आठवनीत रमलेला नेता 'बालपणी सुरपेटी शिकायची भयंकर इच्छा होती पण राजकारनातुन वेळ मिळालाच नाही' अस बोलून गेला. ते वाक्य कार्यकर्त्यांच्या हृदयाला भिडल... दुसरया दिवशी नेता अड्डयावर आल्यावर पाहतो तो काय.. समोर सुरपेटी.. एक कार्यकर्ता हळव्या स्वरात म्हणाला.. 'साहेब, दोघास्नी पाठवलय सुरपेटीचा मास्तर शोधायला.. 2 -3 दिवसात सापडलच एकतरी मास्तर.. तुम्ही सुरपेटी शिका साहेब.. आम्ही आहोतच रोज ऐकायला...' नेत्याला काय बोलावे समजेना.. तिथून पुढे थोड़ा वेळ star plus वरचे काही senty scenes पार पडले.. नेत्याने सुरपेटी उचलून कोपरयात नेवून ठेवली आणि पुन्हा दिल्ली पासून गल्ली पर्यंतच्या गप्पा सुरु झाल्या... :)
सरपंचांच्या पोराला पल्सर घ्यायची आहे अशी बातमी गावात पसरली... गावात पत्र्याची शेड असलेल एक टु व्हीलर repairing च दूकान होत आणि त्याच्या बोर्डवर बजाज चा लोगो होता म्हणून लोक त्याला बजाजचा डीलर म्हनत. सरपंचांच्या कार्यकर्त्यानी त्या डीलरला निरोप धाडला की तुझ्या शो-रूम (?) मध्ये 2 दिवसात 2 पल्सर दिसायला पाहिजेत. तो बिचारा जिल्ह्याच्या गावाला जावून २ पल्सर घेवून आला. त्या दोन पल्सर गावभर फिरवून बघितल्यावर सरपंच सुपुत्राना त्या दोन्ही गाड्या click नाही झाल्या... म्हणून जिल्ह्याच्या गावाला जावून मोठ्या शोरूम मधून गाडी आणायच ठरल.. कार्यकर्त्यानी 4 व्हीलर ची व्यवस्था केली... सरपंच, कार्यकर्ते आणि सत्कारमूर्ती सरपंचसुपुत्र असा ताफा गाडी खरेदीसाठी बाहेर पडला.. गावाच्या वेशीवर आल्यावर एक कार्यकर्ता म्हणाला की त्या डीलरला पण घेवून जावू.. म्हणून गाडी परत गावातल्या शोरूमकड़े वळवली.. तो बिचारा गाडी repair करत बसला होता.. त्याला तसाच उचलून गाडीत बसवला आणि गाडीने जिल्ह्याकडे प्रस्थान केले...
ह्या आणि असल्या अनेक विनोदी क्षणांबरोबरच काही हळवे क्षणसुद्धा मी अनुभवले... माझ्या बाबांचा एक कार्यकर्ता आहे... कार्यकर्ता कमी आणि मित्र जास्त.. लहानपनीपासुनचा मित्र.. त्याच गावात एक छॊटस होटेल आहे.. होटेल कसल टपरीच आहे ती.... बाबांच दर्शन झाल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होत नाही अशी त्याची श्रद्धा म्हणून माझ्या बाबाना तो दर्शन ह्या नावानेच बोलवतो.. थोडक्यात त्याच वर्णन करायच झाल तर 'अगदी साधा माणूस'.... माझे बाबा सभापती म्हणून नीवडून आले तो दिवस आमच्या आयुष्यातला खुप मोठा दिवस होता.. सभापती पद म्हणजे तालुक्यातल्या जवळपास 80 गावांच प्रमुख पद... तालुक्याच्या गावी एक मोठ्या मैदानावर माझ्या बाबांचा सत्कार समारंभ चालू होता.. मोठ मोठे नेते, ढोल ताश्यांचा गजर.. गुलालाची उधळण चालू होती... त्या सगळ्या गर्दीच्या मागे बाबांचा तो मित्र एक छोटासा हार घेवून उभा होता.. बाबांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यानी त्याला पुढे येण्यासाठी हात केला.. इतक्या मोठमोठ्या लोकांचा गर्दित सुद्धा आपल्या मित्राने आपल्याला हाक मारल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता.. त्या गर्दीतुन वाट काढत तो मित्र पुढे आला आणि माझ्या बाबाना सत्काराचा हार घालत 'जिकलास' म्हणत मीठी मारली... यशाच्या शिखरावर असताना जुन्या दिवसांची जाण ठेवत माझ्या बाबानी आपल्या मित्राला मारलेली ती हाक आणि त्या मित्राने अभिनंदनपर मारलेली ती निस्वार्थ मीठी मला बरच काही शिकवून गेली... !!!

2 comments: