Thursday, April 14, 2011

पहिल काहीतरी..

परवाचा दिवस. as usual... nothing new.. तसही सॉफ्टवेअर इंजीनीअरच्या आयुष्यात नवनवीन bugs सोडले तर नवीन अस जास्त काही घडत नाही. असो.. thats a different story. ऑफिस मधली कामे आटपून घरी पळायच्या तयारीने computer shut down केला. सगळे कृत्रिम tata, bye bye, see u tomorrow संपवून एकदास त्या AC वाळवंटातुन बाहेर पडलो. बाहेर पडताक्षणी गार वारयाची एक झुळूक स्पर्ष करून गेली. गेले २-३ दिवस असच होत होत. त्याची फ़क्त चाहुल लागत होती.. पण त्याचा साक्षात्कार काही होत नव्हता. म्हणून मी त्याचा जास्त विचार न करता बस मध्ये जावून बसलो. Headphones वर गाणी ऐकता ऐकता कधी झोप लागली काही समजलच नाही... कुणीतरी चेहरयाला स्पर्ष केल्यासारख झाल म्हणून डोळे उघडले... "उठ वेडया, झोपलायस काय... तो आलाय" असा निरोप द्यायला पाण्याचा एक थेंब माझ्या चेहर्यावर विसावला होता... खीडकीबाहेर पाहिल तर धगाळलेल वातावरण... हात बाहेर काढले आणि पुन्हा एकदा तो जादुगार भेटीला आल्याच जाणवल.... पहिला पाऊस आला होता.... पुन्हा एकदा.... पहिल काहीतरी.... :)
"पहिल" ह्या शब्दात कमालीच वेडेपण लपलेल असत.. सगळ पहिल अनमोल असत. पहिल्यांदा उच्चारलेला 'आई' हा शब्द.. शाळॆतला पहिला दिवस.. पहिल बक्षिस.. बाबांच्या हातात ठेवलेला पहिला पगार..... पहिल प्रेम.. प्रेमातला पहिला स्पर्ष... सगळ सगळ अप्रतिम.. कोट्यावधी रुपयानी सुधा विकत मिळणार नाही अशी आठवनींची अजब संपत्ती.. पण ह्या सोन्याच्या नाण्याला सुद्धा दूसरी बाजू आहे.. आणि ती म्हणजे हे सगळ आयुष्यात एकदाच अनुभवता येत.. तो क्षण गेला की त्याच्या पाउलखुणा फक्त आठवनींच्या रुपात उरतात... बाकी काहीच उरत नाही... पण एकमेव "पहिल" काहीतरी आहे जे दरवर्षी अनुभवता येत.... आणि प्रत्येक वेळी तितकाच प्रभाव पाडून जात... तो म्हणजे "पहिला पाऊस"....
कानात "कधी तू.. कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात " वाजत होत.. आणि बाहेर पहिला पाऊस.. मला एक सांगा.. इतकी भन्नाट संध्याकाळ असताना आयुष्याच अस्तित्व असण्याच्या दुसरया कुठल्या पावतीची गरज आहे का.. :) परवा पुन्हा तो चमत्कार अनुभवला मी.. कधी एकदा बस मधून बाहेर पडीन अस झाल होत... जस माझ घर जवळ आल तस माझ्या जवळच्या 'मला माझ्या पासून दूर ठेवणारया' वस्तुंची चिंता मला सतावु लागली.. आता त्या "वस्तु" म्हणजे पाकिट, मोबाईल.... पण मनात आल हे सगळ गेल तर परत मिळवता येईल.. पण ह्या वर्षीचा पहिला पाऊस परत नाही येणार.. ते सगळ गुंडाळल रुमालात..
बस थांबली.. मी डोळे मिटूनच बाहेर आलो.. कारण मला माहित होत.. I was going to feel something which I would remember throughout my life.. आणि असे क्षण डोळे मिटूनच अनुभवायचे असतात...
खाली उतरलो.. आणि एखाद्या अफाट सौन्दर्यवतीने आपल्याकड़े हसत एक अप्रतिम नजर टाकावी इतक्या भन्नाट आवेशात तो पाऊस कोसळत होता.. गेल्या वर्षात आलेल अपयश, सतावनारया चिंता, उत्तर नसलेली मानवनिर्मित गणितं... सगळ सगळ भीजताना वाहून गेल.. रस्त्यावरून दिसेल ते वाहत घेवून जाणारया पाण्याने पुन्हा एकदा लढायची जिद्द शिकवली.. मी रुमालात गुंडाळलेल्या निर्जीव वस्तुंसारख्या वस्तु सांभाळत आडोश्याला तोंड वाकड करून उभारलेली मानस बघून थोड हसू आल.. वाटल.. देव पण डोक्याला हात लावून बसला असेल की ह्याना अजुन काय देवू म्हणून.. मी फ़क्त वर पाहून त्याला अनुभवत होतो.. अशा वेळी मनात salary appraisal, traffic problem, EMI, home loan असल काही नाही येत.. मनात असते ती फ़क्त त्या विधात्याच्या असण्याची जाणीव..
यश अपयश कृत्रिम संकल्पना आहेत.. आयुष्य हे फ़क्त आणि फ़क्त क्षणात लपलय.. म्हणुनच खुप जुना मित्र आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटल्यावर मीठी मारताना जे पाणी डोळ्यात येत ते महिन्याच्या शेवटच्या दिवशी salary deposit चा sms वाचून नाही येत.. दर वर्षीचा पाऊस अस काहीतरी अनमोल देवून जातो.. यंदाचाही पहिला पाऊस मला नको असलेल सगळ घेवून गेला.. आणि देवून गेला एक नवी उमेद !!!

Wednesday, March 2, 2011

प्रेम म्हणजे... ???


माणूस आणि प्रेम यांच तस खुपच जवळच नात. 'मी दारु पीत नाही' हे वाक्य एक वेळ पटु शकेल पण 'मी आज पर्यंत बाटलीकड़े कधी पहिलेही नाही' हे वाक्य साफ़ खोट. अगदी तसच 'मी कधी प्रेमात जास्त गुंतलो नाही' हे एक वेळ बरोबर असेल पण 'मी आज पर्यंत कधी कुणाच्या प्रेमात पडलोच नाही' हे अशक्य. प्रत्येकाला कधी ना कधी कुणाची ना कुणाची नजर चटका लावून गेलेलीच असते... काहीजन मान्य करतात तर काही खोट बोलून रिकामे होतात इतकाच काय तो फरक.. बर असो.. पण प्रेमासारखी दूसरी अद्भुत भावना कुठलीच नाही... free of cost जर तुम्हाला 'आयुष्य' ह्या संकल्पनेचा खरा अर्थ समजावून सांगणारा demo अनुभवायचा असेल तर कुनाचेतारी डोळे वाचायचा हळूच प्रयत्न करा.. त्यानंतर तुमच्यात जो काही बदल घडेल त्यावर तुमचा स्वताहाचा देखील विश्वास बसणार नाही..... पण एक प्रश्न असा आहे ज्याची कितीही उत्तरे मिळाली तरी मला तो प्रश्न अनुत्तरितच वाटतो.. 'हे प्रेम म्हणजे नक्की काय असत?'
तो आणि ती एकाच कॅालेज मध्ये.... एकमेकांचे खुपच छान friends... तासन तास गप्पा मारत बसतात.. एकमेकांच्या मनातल सगळ शेअर करतात.. सगळ्या कॅालेजमध्ये ह्यांच काहीतरी चालु आहे अशी चर्चा.. पण त्याची ह्या दोघांनाही फिकिर नाही.. ते दोघेही आपल्या नात्याल्या 'खुप छान मैत्री' असे काहीतरी नाव देवून रिकामे झालेत... बस ने जाता येत असुनही गप्पा मारता येतात म्हणून रोज ते दोघे चालत कॅालेजला जातात.. पण चालन तब्येतीला चांगल असत हे त्यामागच कारण आहे असे दोघेही एकमेकाना सांगतात... एकदा रस्ता ओलांडताना तो दोन पाउले पुढे गेला अन गाडी येत असलेली पाहून ती तिथेच थांबली.. ती आपल्या बरोबर नाहीये हे पाहून तो कावरा बावरा झाला आणि त्याच्याही नकळत दोन पावुले मागे गेला.. ती त्याचा चेहरा पाहून खुदकन हसली आणी म्हणाली 'तू का परत आलास?' तो निशब्द होवून तिच्या हसरया चहर्याकडे पाहत राहिला... ती सोबत असावी म्हणून त्याच मागे परतन आणि तो आपल्यासाठी परत आल्याच पाहून तिला मनातल्या मनात आनंद होन म्हणजे प्रेम काय हो?
संध्याकाळची वेळ.... तो आणी ती कॅाफी हाउस मध्ये बसलेत.. दोघेही एक मेकांची नजर चुकवत कुठेही इकडे तिकडे पाहायचा प्रयत्न करत आहेत.. खर तर त्याच आणि तीच एकमेकांवर अफाट प्रेम.. पण काही दिवसांपूर्वी जोराच भांडण झालय.. तेव्हा पासून अबोला आहे.. भांडणापूर्वी आजच्या दिवशी इथे भेटायच ठरल होत म्हणून दोघेही न चुकता आलेत ... पण आधी बोलणार कोण... त्याला मनात वाटते दर वेळी मीच काही चुक नसली तरी पहिला बोलतो पण आता मी नाही बोलणार अन ती मनातल्या मनात म्हणते किती हा ego , sorry शब्द म्हणायला इतका का वेळ लावावा एखाद्याने..... काही केल्या अबोला संपेना.. वेटर आला.. तो वेटरला म्हणाला, 'दो कॅाफी लाओ, और वेगवेगळॆ बिल्स लाओ' ती गालातल्या गालात हसली.. ती हसलेली पाहून त्याची नजर तिच्या नजरेत पडली आणि तिला हसू आवरता आवरेना... अन ती हसलेली पाहून त्याला जग जिंकल्याचा feel आला.. 'चिडके, हसताना इतकी छान दिसतेस तर मग कशाला उगाच फुगतेस माझ्यावर'... हसता हसता तिने त्याचा हात हातात घेतला.. डोळे मिटून त्याचा हात आपल्या गालाला लावत म्हणाली, ' नको अस करू कधी.. मला खुप एकट वाटत तू नसलास की'.. त्यालाही गहिवरून आल.. पण तिला पुन्हा हसवन्यासाठी तो म्हणाला,' तू भांडणानंतर माझा हात असा पकड़नार असशील तर मग मी का भांडू नये'.. वेटर आला.. तो त्याला thanks म्हणून हसत म्हणाला.. ' एकच बिल आन रे भाऊ'.... चुक कुणाची हे विसरून दोघानी एकमेकांचा हात पकड़न म्हणजे प्रेम काय हो?
तो आणि ती best friends ... अगदी बालपनापासून एकत्र आहेत.. अनेक सुख दुखाच्या क्षणात एकमेकाना साथ दिले.. एक मेकांचे birthdays न विसरता दर वर्षी celebrate करतात.. मनातल खोलवरच फ़क्त एकामेकानाच सांगतात .. पण तरी फ़क्त आणी फ़क्त best friends ... तिचा एके दिवशी त्याला फोन आला.. लगेच भेटायला ये.. खुपच urgent आहे.. तो कसलाही विचार न करता तिच्या हाकेला साद देत भेटायला गेला.. तिने त्याला पाहिल्या पाहिल्या मीठी मारली .. 'माझ्या स्वप्नांचा राजकुमार मला भेटला '... तिच्या त्या एका वाक्याने त्याच्या मनावर वीज कोसळल्याच्या वेदना झाल्या... हे असे का होतय हे त्याच त्यालाच समजेना.. तरी हे वादळ लपवत तो हसत congrats म्हणाला.. 'ह्या weekend ला तू माझ्या बरोबर लग्नाच्या shopping ला यायच आहेस.. मला कारण नकोयत.. माझी choice तुझ्या पेक्षा अजुन चांगली कुणाला समजणार वेड्या' .... तिचा एकेक शब्द त्याच्या मनाच्या चिंधड्या करत होता .. 'see you on weekend' म्हणून ती हसत हसत निघून गेली.. ह्याच्या मात्र डोळ्यातून त्याच्या नकळत दोन थेंब हळूच बाहेर आले.. तो एकटाच तिच्या पाठमोर्या आकृतीकड़े बघत तिला जाताना बघत राहिला.. तिच्या डोळ्यातला आनंद पाहून स्वताहाचे अश्रु तिच्या पासून लपवत त्याच तिला जावू देण म्हणजे प्रेम काय हो?
तो आणी ती लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करत आहेत.. जुने मित्र मंडळी जमलेत.. दोघांच्याही डोळ्यात समाधानाची छटा आहे.. गेल्या २५ वर्षातले सगळे क्षण दोघांच्याही नजरे समोर येत आहेत.. काही सुखाचे, काही दुःखाचे.. एखाद्या लाटे प्रमाने येवून थडकत आहेत.. मित्र मंडळी तीला गाणे म्हणायची विनंती करतात.. ती हलकेच डोळ्याने त्याची परवानगी मागते.. तो थोडस हसत डोळ्यानीच तिला परवानगी देतो..
'एक प्यार का नगमा है, मौजोंकी रवानी है,
जिंदगी और कुछ भी नही.. तेरी मेरी कहानी है.....'
म्हणता म्हणता तिला अश्रु अनावर होतात.. त्याचेही डोळे पाणावतात.. २५ वर्षांच्या अविरत प्रवासानंतर एकमेकांचे डोळे वाचायची जादू दोघांमध्येही कायम असन म्हणजे प्रेम काय हो?
अशा अनेक क्षणांमधून प्रेम नावाच्या अनमोल भावनेचा साक्षात्कार तुम्ही देखील पाहीला किंवा अनुभवला असेलच.. पण खर सांगू का.. एक प्रश्न अजुनही आहे ज्याची कितीही उत्तरे मिळाली तरी मला तो अनुत्तरितच वाटतो.. 'हे प्रेम म्हणजे नक्की काय असत?'

Saturday, February 12, 2011

जाने क्या चाहे मन.. बावरा...

'आज मन लागत नाहिये यार'... 'मनाला कोण समजावनार'.... 'माझ मन तिच्यात गुंतलय' ... बाप रे. मन मन आणि नुसत मन. गोंधळ घातलाय ह्या मनाने सगळीकड़े.. एक दिवस ठरवल, थोड़ा वेळ काढून ह्या मनाला एकट गाठून जाब विचारायचा... बस झाले ह्याचे नखरे. खुप खुप प्रयत्न केल्यावर शेवटी माझ्या तावडीत सापडल.. घट्ट पकडून हाता पायाला दोरयाने बांधून मी त्याला समोर बसवल... अन सुरु झाली एक कहानी.. कहानी एक पण कलाकार दोन... एक मी अन माझ मन !!!!!
हुबेहूब माझ्यासारखा चेहरा, पण डोळ्यात आकाशा इतका अफाट आत्मविश्वास... चेहर्यावर कोणत्याही प्रश्नाच सहज उत्तर देइन अशी गुर्मी... कुणालाही घाबरत नसल्याचा अविर्भाव !! थोडा वेळ एकमेकांच निरिक्षण केल्या नंतर मीच विचारल... 'अरे मना, हा काय खेळ मांडला आहेस तू.. किती वेळा सांभाळुन घ्यायच तुला, बस कर हे पोरखेळ आता.. सगळ सुरळीत चालु असताना मध्येच तुला काहीतरी विचित्र सुचत असत.. Be Practical यार... अरे खुप साधी straight forward system तयार केले आम्ही... moday to friday काम आणी बाकीचा वेळ आराम.. पैसा कमावायचा, घर घ्यायच, मग लग्न, बायको मूल.. परवडली तर एखादी कार.. बस ना मित्रा अजुन हवच काय.. पण साला तू problems add करतोस... मध्येच कुणाच्या तरी आठवनीने हैरान होतोस.. कुठेतरी एकटाच भटकायला जातोस.. उगाचच विनाकारण उदास होतोस.. बस कर यार हे सगळ.. फ़क्त मीच नाही तर संपूर्ण मनुष्य जात तुमच्या community वर वैतागली आहे.......' ऐकता ऐकता मध्येच मला थांबवून माझ मन म्हणाल, 'तुला आठवतय, लहानपणी एकदा पावसाच्या पाण्यात तू पहिल्यांदा कागदाची होडी बनवून सोडली होतीस.. आकाश ठेंगन झाल होत तुज ती तरंगत जात असलेली पाहताना.. आठवतय?' मी हसून म्हणालो 'हो, ते कस काय विसरीन मी'...... 'नाही विसरलास ना... कारण ती होडी बनवायला मी तुला संगितल होत.. तेव्हा तू माझ सगळ ऐकायचास.. खुप जवळ होतास तू माझ्या... ' मी विचारत पडलो.. काय बोलावे समजेना.. जाब मी विचारणार होतो पण व्यथा त्याच्याच होत्या.
थोड़ा आवाज वाढवून मला म्हणाल 'अरे वेड्या, ह्या तुझ्या so called straight forward system मध्ये तू हरवून गेला आहेस... ती होडी वाहत गेली तसाच तुही जात आहेस.. दिशाहीन प्रवासावर.. तेव्हा पडायचा अगदी तसाच पाउस परवा सुधा पडला.. पहिला पाउस.. आ हा.. मला स्पर्श करणारा पावसाचा तो पहिला थेंब.. मी ओरडून सांगत होतो तुला आतून की सोड ती गाडी बाजुला.. उभा राहा.. पसरव तुझे हात.. अन घॆ ते थेंब डोळ्यावर.. त्या क्षणात आयुष्य लपल होत यार.. पण तू नाही ऐकल माझ.. होर्न वाजवत उभा राहिलास वैतागुन.. ' मला काय बोलावे समजेना... पण बोलायच थांबेल ते मन कसल..
'आन्द्या, सच्या, संत्या ची जागा ऑफिस मधल्या Mr. आनंद, Mr.सचिन आणि Mr. संतोष ने घॆतले.. शिवी देवून हाक मारणारी ती आत्मीयता कुठेतरी हरवून आलायस तू.. किती वेळा संगितल तुला की कर फोन त्या वेड्या मित्राना, जा भेटायला अचानक आणी मार एक जोरदार मीठी.. सांग त्याना की तू त्याना फार मिस करतोस ते.. अन बघ तेव्हा त्यांच्या डोळ्यात... त्यांचीही मन ह्याचीच वाट बघत असतील... मार एकदा ऑफिस ला सुट्टी आणि जा कुठेतरी long drive वर त्यांच्या बरोबर...
बाबाना हळूच एकदा टपरीवर घेवून जा.. दोन कट्टिंग ची ऑर्डर दे आणि बाबाना सांग की आज पर्यंत सगळ्या best friends बरोबर कट्टिंग शेयर केला पण better than best राहुनच गेला होता.. अन बघ तेव्हा त्यांच्या डोळ्यात...
एक दिवस पहाटे लवकर उठून आई साठी नाश्ता बनव आणी तिला देवून सांग की आई, तुला तुझ्याच नजरेतून पहायचा हा माझा छोटा प्रयत्न.. अन बघ तेव्हा तिच्या डोळ्यात..
रोजच्या scheduld मधून थोडासा वेळ काढून एकदा अर्धा तास उभा राहून सूर्यास्त बघ... त्याच्याशी थोडा वेळ गप्पा मार... त्याच्याही मनाला बर वाटेल...
मला आणि ह्या सर्वांच्या मनाला तुझ्या so called straight forward system मधले packages नको आहेत रे.. आम्हाला फ़क्त आमच्या हाकेला तुझी मनमुराद साद हवी आहे.... हे सगळ सांग तुझ्या मनुष्य community ला... मन हरवलेली नाहीत रे मित्रा... माणुस हरवलाय...'
मी निशब्द होवून माझ्याच मनाच ऐकत उभा होतो.... कित्येक प्रश्न रोज पडत असतात.. अन त्यांची उत्तर मला माझ्याच मनात उलगडली...
मला गंभीर पाहून थोड्या तिरकस नजरेने माझ्याकडे पाहत मला म्हणाल,' अजुन एक महत्वाच... तुझी ती close friend त्या दिवशी लाल साडी मध्ये खुप छान दिसत होती ना.. मग तस बोलला का नाहीस तिला...' मी हबकलो.. ह्या साल्याला हे कुठून समजल.. मग आठवल हे तर आपलच मन आहे.. गंभीर विषयांची जागा गुलाबी विषयाने घेतली होती.. मी त्याला बजावल 'हे बघ मना, ह्या matter पासून तू दूर राहा.. बाकी सगळ पटलय मला तुझ.. पण इथे नेमक तुझ घोड़ मार खात.. अरे किती चेहर्या मध्ये शोधत असतोस तू "ती" ला... कोण आहे तरी कोण तुझी स्वप्नसुंदरी.. प्रत्येक रोमांटिक गाण्याबरोबर तिची आठवण काढत असतोस... मला एखाद print out दे तिच्या चहर्याच.. नाव गाव...काहीही माहित असेल तर सांग.. मी search मारतो.. एकापेक्षा एक भन्नाट search engines आहेत आमच्याकडे... ही हुरहुर थांबव आता'.............
माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसल... हाता पायाला बांधलेले दोर आपोआप हळुवार निसटले.... मी वेडा इतका वेळ समजत होतो की मी त्याला बांधून ठेवल होत.. पण मनच ते.. त्याला कोण कस बांधणार.. त्याने मला घट्ट मीठी मारली.. बरयाच दिवसानी कुणीतरी "आपल" मीठीत आल्यासारख वाटल... खुप बर वाटल.. पण भानावर येवून मी विचारल.. सांग.. कोण आहे ती.... तर english इस्टाईल मध्ये हळूच माझ्या कानात म्हणाल... "Some feelings are better to be just feeled than expressed" ....... अन भुरकन उडून गेल..मी एकटाच हसत त्या स्वच्छंदी मनाला उडताना पाहत उभा होतो.. रोज पाहतो तसा... !!!

Friday, January 28, 2011

मैफील

15 सप्टेंबर 2002 .... इंजीनीरिंग करायच्या निमित्ताने मी पुण्यात आलो.. लहान वयात इतक मोठ शहर मी पहिल्यांदाच पाहात होतो.. मोठ मोठे रस्ते, अफाट गर्दी, उंच उंच इमारती पाहून मन जितक उड्या मारत होत तितकच घाबरल सुद्धा होत. हॉस्टल मध्ये प्रवेश घेतल्यावर काही दिवसातच नवीन मित्रांची मैफील जमली. मित्रांच जग म्हणजे अद्भुत जग..तिथे प्रत्येक जन खर्या अर्थाने स्वताहाला जगत असतो.. बंधन,नियम, चालीरीती सगळ सगळ तडीपार केलेल मन ते तिथेच मिळत.. आणि त्याच स्वप्नवत जगात मला तो भेटला.. माझा एक मित्र..
"First impression is last impression " अस म्हणतात. पण मला नाही पटत.. त्याच्याही बाबतीत तसच झाल. पहिल्या भेटीत अबोल आणि reserved minded वाटलेला नंतर हळुहळु उलगडत गेला. कदाचीत ह्यालाच हे जग मैत्री म्हणत.. मस्त ग्रुप बनला होता आम्हा मित्रांचा. नुसता दंगा, मस्ती अन जोडीला बेधुंदी.. तारुण्याची दूसरी व्याख्या तरी कुठली.. एकापेक्षा एक नमूने एकत्र आले होते. टपरीवर रोज मस्त गप्पा रंगत होत्या.. आमच्या ग्रुप मध्ये क्रिकेट ची खुप खुप आवड तशी फ़क्त मला आणि त्यालाच होती.. त्यामुळे क्रिकेट ची मॅच असली की तो आणि मी २-२ तास टपरीवरच्या टीवी समोर पडीक असायचो.. १ कटिंग दोघेजन २ तास पुरवायचो.. फोर मारली की टाळी देण, विकेट पडली की शिव्या देण.. अन मॅच हरता हरता जिंकली की आनंदाने मिठी मारण.. ह्या सगळ्यात backlog subjects विसरून जायचो आम्ही..
तो स्वभावाने हळवा.. हसत हसत डोळ्यातल पाणी लपवनारा.. अन अश्रु जमलेल्या डोळ्याना हसवणारा. घरची परिस्थिती बेताची.. वाईट दिवसात फ़क्त एक वेळ जेवलेल पाहिलय मी त्याला. मन भिरभिरायच ते सगळ पाहून. पण ती वेळच जिद्दी होती अन तो त्याहुनही जास्त. BE च्या तिसरया वर्षात असताना एक अपघातात त्याचा पाय दुखावला होता.. त्यामुळॆ त्याचे तीन विषय राहिले. लहान मुला सारखा खांद्यावर मान ठेवून रडला.... पण पुन्हा भरारी घेत त्या वर्षी फर्स्ट क्लास पटकावला त्याने.. त्याच्या नकळत बराच काही शिकत गेलो मी त्याच्या कडून.. उत्कृष्ट स्वयंपाकी, खुप छान मिमिकरी करणारा, नाटकात अभिनय करणारा अशी अनेक रूपे त्याची..
हसत खेळत आम्ही सगळे इंजिनियर झालो.. अनेक आव्हाने साद घालत होती.. त्यालाही जॉब ची अत्यंत गरज होती.. ६ महीने अफाट struggle केल्यावर एके दिवशी पळत पळत त्याने मला मिठी मारली.. आणि कानात "जिंकलो" अस म्हणाला.. आजही ते शब्द जसेच्या तसे आहेत.. त्या दिवशी मला celebration ह्या शब्दाचा अर्थ गवसला..
नंतरची काही वर्ष मस्त मजेत गेली.. एकेक डोंगर पार करत आम्ही झेंडे फडकावत चाललो होतो..टू व्हीलर घेतल्यावर पहिल्यांदा मला भेटायला आला.. मस्त राईड मारून आम्ही काफ्फी चा आस्वाद घेतला.. जुने दिवस आठवत एक मेकांची मस्करी करत दिवस मजेत जात होते.. आयुष्याने रंग बदलले होते.. आता जग आपल आहे अशा आवेशात जगत होतो आम्ही..
5 ऑगस्ट 2008 ... सकाळी 10.30 ला ऑफिस समोर पोहोच ल्यावर मी माझा मोबाइल पहिला तर 16 मिसकॉल्स.. मी callback केल्यावर बातमी समजली की तो एका रोड अपघातात आम्हाला सोडून गेला.. पायाखालची जमीन सरकली.. डोक सुन्न झाल.. पुढचे 5 -10 मीनीट मी सर्वस्व हरवल्यासारख रस्त्यावर उभा होतो..सगळ डोळ्यासमोर आल.. तो परत कधीच भेटणार नाही हे मनाला काही केल्या पटेना.. आजही नाही पटत.. त्याच्या अंत्य दर्शनाला ढसाढसा रडलो आम्ही.. देवाचा मला इतका राग कधीच नाही आला जितका त्यादिवशी आला होता.. सगळ एक क्षणात संपल.. आम्ही हतबल होवून पाहत राहिलो.. त्या दिवसापासून मनात एकाच प्रश्न सदैव पडतो.. त्याच काय चुकल होत?? आणि उत्तर त्या विधात्याकड़ेही नाहीये..
आजही क्षणोक्षणी त्याची आठवण येत असते.. मित्रांच्या मैफीलीत गप्पा रंगल्या की त्याचा उल्लेख आणि डोळ्यात पाणी हे आता ठरलेल.. मन उदास झाल की मग रंगतात त्याच्याशी गप्पा.. तो नाही बोलत.. फ़क्त ऐकतो.. विनोदाना टाळी देतो.. यातनाना डोळ्यात पाणी आणून सांत्वन करतो. माणस दूर नाही जात कधी.. ती सदैव असतात बरोबर.. आठवनींच्या रूपात.. खुप वाटत की स्वर्ग असावा.. इथला प्रवास संपल्यावर त्याची पुन्हा तिथे भेट व्हावी.. पुन्हा एकदा मैफील जमावी.. त्याची अन माझी...