Friday, January 28, 2011

मैफील

15 सप्टेंबर 2002 .... इंजीनीरिंग करायच्या निमित्ताने मी पुण्यात आलो.. लहान वयात इतक मोठ शहर मी पहिल्यांदाच पाहात होतो.. मोठ मोठे रस्ते, अफाट गर्दी, उंच उंच इमारती पाहून मन जितक उड्या मारत होत तितकच घाबरल सुद्धा होत. हॉस्टल मध्ये प्रवेश घेतल्यावर काही दिवसातच नवीन मित्रांची मैफील जमली. मित्रांच जग म्हणजे अद्भुत जग..तिथे प्रत्येक जन खर्या अर्थाने स्वताहाला जगत असतो.. बंधन,नियम, चालीरीती सगळ सगळ तडीपार केलेल मन ते तिथेच मिळत.. आणि त्याच स्वप्नवत जगात मला तो भेटला.. माझा एक मित्र..
"First impression is last impression " अस म्हणतात. पण मला नाही पटत.. त्याच्याही बाबतीत तसच झाल. पहिल्या भेटीत अबोल आणि reserved minded वाटलेला नंतर हळुहळु उलगडत गेला. कदाचीत ह्यालाच हे जग मैत्री म्हणत.. मस्त ग्रुप बनला होता आम्हा मित्रांचा. नुसता दंगा, मस्ती अन जोडीला बेधुंदी.. तारुण्याची दूसरी व्याख्या तरी कुठली.. एकापेक्षा एक नमूने एकत्र आले होते. टपरीवर रोज मस्त गप्पा रंगत होत्या.. आमच्या ग्रुप मध्ये क्रिकेट ची खुप खुप आवड तशी फ़क्त मला आणि त्यालाच होती.. त्यामुळे क्रिकेट ची मॅच असली की तो आणि मी २-२ तास टपरीवरच्या टीवी समोर पडीक असायचो.. १ कटिंग दोघेजन २ तास पुरवायचो.. फोर मारली की टाळी देण, विकेट पडली की शिव्या देण.. अन मॅच हरता हरता जिंकली की आनंदाने मिठी मारण.. ह्या सगळ्यात backlog subjects विसरून जायचो आम्ही..
तो स्वभावाने हळवा.. हसत हसत डोळ्यातल पाणी लपवनारा.. अन अश्रु जमलेल्या डोळ्याना हसवणारा. घरची परिस्थिती बेताची.. वाईट दिवसात फ़क्त एक वेळ जेवलेल पाहिलय मी त्याला. मन भिरभिरायच ते सगळ पाहून. पण ती वेळच जिद्दी होती अन तो त्याहुनही जास्त. BE च्या तिसरया वर्षात असताना एक अपघातात त्याचा पाय दुखावला होता.. त्यामुळॆ त्याचे तीन विषय राहिले. लहान मुला सारखा खांद्यावर मान ठेवून रडला.... पण पुन्हा भरारी घेत त्या वर्षी फर्स्ट क्लास पटकावला त्याने.. त्याच्या नकळत बराच काही शिकत गेलो मी त्याच्या कडून.. उत्कृष्ट स्वयंपाकी, खुप छान मिमिकरी करणारा, नाटकात अभिनय करणारा अशी अनेक रूपे त्याची..
हसत खेळत आम्ही सगळे इंजिनियर झालो.. अनेक आव्हाने साद घालत होती.. त्यालाही जॉब ची अत्यंत गरज होती.. ६ महीने अफाट struggle केल्यावर एके दिवशी पळत पळत त्याने मला मिठी मारली.. आणि कानात "जिंकलो" अस म्हणाला.. आजही ते शब्द जसेच्या तसे आहेत.. त्या दिवशी मला celebration ह्या शब्दाचा अर्थ गवसला..
नंतरची काही वर्ष मस्त मजेत गेली.. एकेक डोंगर पार करत आम्ही झेंडे फडकावत चाललो होतो..टू व्हीलर घेतल्यावर पहिल्यांदा मला भेटायला आला.. मस्त राईड मारून आम्ही काफ्फी चा आस्वाद घेतला.. जुने दिवस आठवत एक मेकांची मस्करी करत दिवस मजेत जात होते.. आयुष्याने रंग बदलले होते.. आता जग आपल आहे अशा आवेशात जगत होतो आम्ही..
5 ऑगस्ट 2008 ... सकाळी 10.30 ला ऑफिस समोर पोहोच ल्यावर मी माझा मोबाइल पहिला तर 16 मिसकॉल्स.. मी callback केल्यावर बातमी समजली की तो एका रोड अपघातात आम्हाला सोडून गेला.. पायाखालची जमीन सरकली.. डोक सुन्न झाल.. पुढचे 5 -10 मीनीट मी सर्वस्व हरवल्यासारख रस्त्यावर उभा होतो..सगळ डोळ्यासमोर आल.. तो परत कधीच भेटणार नाही हे मनाला काही केल्या पटेना.. आजही नाही पटत.. त्याच्या अंत्य दर्शनाला ढसाढसा रडलो आम्ही.. देवाचा मला इतका राग कधीच नाही आला जितका त्यादिवशी आला होता.. सगळ एक क्षणात संपल.. आम्ही हतबल होवून पाहत राहिलो.. त्या दिवसापासून मनात एकाच प्रश्न सदैव पडतो.. त्याच काय चुकल होत?? आणि उत्तर त्या विधात्याकड़ेही नाहीये..
आजही क्षणोक्षणी त्याची आठवण येत असते.. मित्रांच्या मैफीलीत गप्पा रंगल्या की त्याचा उल्लेख आणि डोळ्यात पाणी हे आता ठरलेल.. मन उदास झाल की मग रंगतात त्याच्याशी गप्पा.. तो नाही बोलत.. फ़क्त ऐकतो.. विनोदाना टाळी देतो.. यातनाना डोळ्यात पाणी आणून सांत्वन करतो. माणस दूर नाही जात कधी.. ती सदैव असतात बरोबर.. आठवनींच्या रूपात.. खुप वाटत की स्वर्ग असावा.. इथला प्रवास संपल्यावर त्याची पुन्हा तिथे भेट व्हावी.. पुन्हा एकदा मैफील जमावी.. त्याची अन माझी...

2 comments: